मुंबई – दि. 12 (प्रतिनिधी) –
महाराष्ट्राची भूमी ही समृद्ध भूमी आहे. इथली जमीन सुपीक आहे. दुर्दैवाने आज महाराष्ट्रातील मराठवाडा व इतर काही भाग तीव्र दुष्काळाने होरपळत आहे. यातून सावरण्यासाठी पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनाची तीव्र गरज असून जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या जैन इरिगेशनने आपल्या कार्याची व्याप्ती आणखी वाढवून पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. ते मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री नवरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.